व्हेज बिर्यानी


मी ही बिर्यानी बरेच वेळा बनवलीये पण शेवटी काल फोटो काढण्याचा अवसर मिळाला. त्यामुळे खास माझ्या व्हेजीटेरीअन दोस्तांसाठी ही पाककृती.

व्हेज बिर्यानी
साहित्य
३ वाटी तांदूळ
३५०ग्राम भेंडी
२५० ग्राम छोटी वांगी
२५० ग्राम गाजर
२ कच्ची केळी
४ बटाटे
४ कांदे
३ टोमेटो
२ चमचे पुदिना पानं
१० लसूण पाकळ्या
२ चमचे किसलेला आलं
१/२ वाटी काजू
१/४ वाटी बदाम
१ चमचा किसलेले सुके खोबरे
१/२ चमचा खसखस
२ सुक्या मिरच्या
१/४ चमचे बडीशेप
१/४ चमचा मिरे
१ चमचा जिरे
१ चमचा धने
३/४ चमचे तिखट
१ चमचा गरम मसाला
२ वेलची
२ लवंग
३ दालचिनी काड्या
१/४ वाटी दुध
चिमुटभर केशर
मीठ चवीपुरता
तूप
तेल

कृती
  • कुकरमध्ये दोन बटाटे शिजवून घेणे
  • तांदूळ गरम पाण्यात अर्धा तास भिजवणे
  • खसखस पाण्यात भिजवून ठेवणे
  • वांगी, भेंडी, सालं काढून आणि चिरून कच्ची केळी, २ बटाटे आणि गाजर तळून घेणे.
  • एका भांड्यात पाणी गरम करून त्यात भिजवलेले तांदूळ घालणे. भात बोटचेपा शिजेपर्यंत शिजवून घेणे. जास्तीचे पाणी गळून टाकणे.
  • एक चमचा तूप गरम करून त्यात वेलची, लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा टाकणे. हे मिश्रण भातात घालुन एकत्र करणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात २ कांदे बारीक चिरून शिजवणे. तेलातून बाजूला काढून ठेवणे.
  • त्याच कढईत अजून एक चमचा तेल घालुन, जिरे, मिरे, सुकी मिरची, धने, बडीशेप, सुके खोबरे, दालचिनी, १/४ वाटी काजू आणि बदाम घालुन तळणे
  • त्यात गरम मसाला, तिखट, खसखस, पुदिना पानं आणि आधी भाजलेला कांदा घालुन ढवळणे. मसाले सुगंध सोदेपार्यानता भाजून घेणे.
  • मिश्रण थंड करून त्यात टोमेटो घालुन मिक्सरमध्ये वाटणे.
  • कढईत तूप गरम करून त्यात वरचे वाटलेले मिश्रण घालणे. तेल सोडेपर्यंत भाजून घेणे.
  • आता त्यात तळलेल्या भाज्या आणि मीठ घालुन २ मिनिट शिजवणे.
  • दुध आणि केशर एकत्र करून गरम करून घेणे.
  • उरलेले २ कांदे बारीक उभे चिरून आणि काजू कुरकुरीत आणि गुलाबी होईपर्यंत तळून घेणे.
  • कुकरला तूप लावून त्यात उकडलेल्या बटाट्याचा, १/३ भाग भात, १/२ भाग भाजी, अजून १/३ भाग भात, बाकी उरलेली १/२ भाग भाजी आणि उरलेला १/३ भाग भात असे थर लावणे.
  • ह्या थरांच्या आर पार भोकं पाडून त्यावर केशर-दुधाचे मिश्रण शिंपडणे.
  • कुकर मंद आचेवर ठेवून, एक शिट्टी होईपर्यंत शिजवणे. बिर्यानीवर आधी तळलेला कांदा आणि काजू पसरवून वाढणे.

टीप
मी भाज्या ग्रेव्हीमध्ये शिजवण्याऎवजी त्यांना तळून ग्रेव्हीमध्ये घातले. त्यामुळे कुठलीच भाजी अर्धी कच्ची किंव्हा जास्त शिजली नाही आणि चव एकदम छान आली.
भाज्यातळताना छोटे बटाटे असतेतर जास्त चांगले झाले असते तर अख्खे तळता आले असते असे राहून राहून वाटले.

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP